Posts

Showing posts from March, 2019

निसर्ग गाणे

जरा उन्हं वगैरे विसरून सकाळी सकाळी झाडा कडे पहिले की तजेलदार हिरवी पाने दिसतात .काही आंब्याच्या झाडांवर कोवळ्या हिरव्यागार कैऱ्या दिसतात .काही वेडे आळशी आंबे कैऱ्या अंगावर वागवण्या ऐवजी पुन्हा तांबूस पालवीने डवरून जाहीर करतात आता आम्हाला वेगळे वागायचेय.        पिंपळ तर उत्साहाने नुसता सळसळत असतो , कित्ती वेगवेगळे पक्षी त्याच्या फांद्यांवर बागडत असतात. त्याला कुऱ्हाडी ची किंवा दगड खाण्याची भीती नाहीच. कारण बेदरकारपणे सगळ्या झाडांवर कुर्हाड चालवणारा माणूस पिंपळावर अंध श्रद्धे पोटी तरी कुर्हाड चालवत नाही. कसा चौ अंगानी पसरत चाललाय तो!     आसुपालव आपली नवी पाने कावळ्यांची  घरटी लपवायला वापरतोय आणि जरा डोकावून पाहायला सुरवात केली की कावळे कर्कश्श कावकाव करून आपल्या जातभाई ना गोळा करतात आणि जरा जरी आपल्याकडून धोक्याची शंका आली तर सतत लक्ष ठेवून टोच मारून आपले बाहेर डोकावणे हे बंद करू शकतात.        मोगरीच्या झाडालाही नवी पालवी येवून झाड कळ्यानी  भरून गेले आहे. जरा पाण्याचा ताण पडताच झाडे मलूल होत आहेत. गार वार्यात सकाळी संध्याकाळी पाने डोलताहेत. किती छान न! जरा थांबा अन् पहा याच्याकड

ययाती बद्दल!!

काही दिवसांपूर्वी 'ययाती ' हे श्री .वि.स. खांडेकर यांचे पुस्तक पुन्हा वाचले. शाळकरी वयात वाचले होतेच पण तेंव्हा फक्त मजा म्हणून किंवा अरे इतके गाजलेले आहे तर वाचू या म्हणून वाचलेले होते. यावेळी अगदी प्रस्तावनेसहित वाचले. ते दोन शब्द १९६१ सालातले आणि पुस्तक हाता वेगळे  केले ते ह्या पुस्तकाचा जन्म का आणि कसं झाला ह्याबद्दलची पार्श्वभूमी वाचून ! हा ययाती सर्वांच्याच मनात असतो त्याचा उपयोग करून  जाहिरात बाजी करून शारीरिक सौंदर्याचा बोलबाला केला जातो ते जपण्यासाठी करोडो रुपयाच्या बाजारपेठेला जन्म दिला जातो . उपभोगाची ज्वाला भडकतच राहावी संयमाचे आवरण त्यावर राहू नये यासाठीच जणू ह्या पासष्टाव्या कलेचा उपयोग केला जातो पण मनातल्या ययातीला  रोखायचे असते ते आपणच....  त्या पार्श्वभूमी मध्ये लिहिलेला बारावा भाग माझ्या मनाला जास्त भिडला. त्याकाळात त्यांना जाणवलेले चित्रपटाचे दुष्परिणाम , सामाजिक बेफिकिरी ,काम आणि प्रेमात होत असलेली गल्लत सारे त्याना अस्वस्थ करीत होते ... पण आजही ते आम्हा ला तसेच अस्वस्थ आणि हतबुद्ध करीत आहे ना......