Posts

Showing posts from July, 2019

माझे आण्णा

माझे वडील म्हणजे आपल्या गुजर समाजातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व !एल.आर.पाटील उर्फ एल .आर. फौजदार या नावाने ते सर्वाना परिचित होते. मुंबईत कोणाचे काही काम अडले असेल तर त्या समाज बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचे कंकण त्यानी हाती बांधले होते. जोपर्यंत ते पोलीस खात्यात काम करत होते तोपर्यंत त्यानी वेळात वेळ  काढून आपल्या समाजासाठी कामे केली. शहादा येथील विकास हायस्कूल व आपल्या जन्माग्रमातील कहाटूळ येथील शाळेसाठी त्यांनी मोठा निधी उभारून दिला.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आठ तारखेला त्यांचे दुख:द निधन झाले .त्यांच्या काही आठवणींपैकी ही एक!!                        रेडीओवर गाणे लागले होते. शब्द झरत होते "पप्पा सांगा कुणाचे ........."  मग मला आठवले ते आमचे आण्णा ! असेच दुसरे गाणे "आई आणखी बाबा यातील कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला!"!!हेही असेच मनात कालवाकालव करणारे गाणे!! मला एकदम माझ्या वडिलांची, आण्णांची आठवण आली .खूप दिले त्यानी आम्हाला! पोलिस खात्यातील रुक्ष नोकरी करताना त्यांनी निसर्गावर प्रेम करणे सोडले नाही वेळ मिळेल तेंव्हा एक दिवसासाठी का होईना पण जंगलात ने

आला आला पावसाळा!

कडाक्याच्या उन्हाच्या झळा सोसल्याशिवाय पावसाचे महत्त्व जाणवत नाही हे खरे!  ह्या वर्षी भारतातला उन्हाळा अनुभवला नाही पण अमेरिकन टेक्सास चा कडक उन्हाळा अनुभवला .तपमान १००° फॅरनहाईट ला पोचले होते. पण वाॅटरपार्क ,कारंजी, पोहण्याचा तलाव यामुळे ऊन्हाळा सुसह्य  होता. पावसात आपल्याला आनंद होतोच पण ही झाडे काय विचार करत असतील? मला एकदा भर पावसात महाबळेश्वरला फिरताना झाडांनीच हे गुज   नभात झाली कृष्णघनांची गर्दी कडाडून विजेने दिली पावसाची वर्दी सोसाट्य़ाच्या वार्‍यासंगे उडे पाचोळा गर्द दाट झाडी डोले हाले होई रान सर्द सर्द  आता पुढे होइल हो अमृताचा वर्षाव आता नाही सोसायाचे कुर्‍हाडीचे दुष्ट घाव फुला फुला रे सारे फुटो नवे नवे कोंब गुलमोहर बोले,चाफा सांगे रानी झाडे चिंब चिंब! निसर्गाचा असा जल्लोष सुरू झाला की धरती थरारते. गवताची नाजूक पाती तिच्यावर आपली मायेची झूल पांघरतात. त्या हिरवाईने माखलेली धरती पाहून पाऊस आणखीच चेकाळतो जणू! त्याचा हल्लागुल्ला सुरू होतो.सैराटासारखा कोसळत तो सारे नद्यानाले इतके भरतो की तेसुद्धा आपली मर्यादा सोडून उफाणून वाहू लागतात. सागरही गर्जू लागतो. पावसाळी ढगां