Posts

गांधींबद्दल

 जरूर वाचा निश्चित आनंद मिळेल महात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी? ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते. काय गंमत आहे, आपल्यावर कोणाकोणाचे परिणाम आहेत, हे आपल्यालाच ठाऊक नाही. मागे कुणाबरोबर जोतीराव फुल्यांविषयी भरभरून बोललो, तेव्हा समजलं, आपल्यासाठी जोतीराव काय आहेत ते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, काही म्हणा, ‘तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.’ मी विचारलं, ‘कोण म्हातारा?’ तो हसला व म्हणाला, ‘गांधीजी.’ मी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ते जाऊनही छप्पन्न वषेर् झाली, तरी! ही काय जादू आहे? कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणताना ऐकतो की, कधी नव्हेत इतक

गणपती बाप्पा मोरया

 कोणी  दूरदेशी  निघाले  कि  आपण जोरजोराने  हात  हलवून  निरोप  देतो पुढच्या  प्रवासा साठी   शुभेच्छा  देतो आणि एका बाजूला  हळूच  मान वळवून  डोळे  टिपतो.  घर रीकामे ओकेबोके  वाटते. अगदी  अश्याच  भावना  गणेश  विसर्जनाला  दाटतात. एकीकडे  बाप्पा  ची निरोपाची  तयारी  उत्तर  पूजा ,  शिदोरी, आरतीची  तयारी  ,  निर्माल्य  गोळा करून ते ही आठवणीने  घेणे  आणि  दुसरीकडे  मनात खोल पडत जाणारा खड्डा  आणि इतरांना  जाणवू नये  म्हणून ओढलेला  उत्साहाचा  मुखवटा!  अगदी  आरती  म्हणताना  मध्येच  सूर खालावतो. बाप्पाची मूर्ती  डोळे भरून  पाहून  मनात  साठवून  ठेवली जाते. भरले डोळे  लपवत बाप्पा ला निरोप दिला  जातो. . . . .  निरोप घेतला  जातो  , पुढच्या वर्षी लवकर या  अश्या  गजराने! !! गणपती बाप्पा मोरया  पुढच्या वर्षी लवकर या!

वाचन वेड

 Shriniwas Deshpande   यांच्या या  कॉमेन्ट ने   काही जाणवले ते..........                                                                "नारदाने  वाल्या कोळ्याला पोँक करून विचारले, कोणासाठी असली अघोरी कामे करतोस बाबा ! का गुंतून राहतोस आपल्याच कामात ?  आपल्या फ्यामिलीसाठी का ? मुलाबाळांसाठी का ? मग जा अन त्यांना लगोलग पुसून ये,  विचारून ये,  या पापात शेअर घेणार का ?  त्याने लगोलग फ्यामिलीच्या वाॅलला टॅग टाकला  तर घरची सगळीच पाठ फिरवून बसलेली, बीजीचा बोर्ड लावून आपआपल्या  व्हाट्सअॅपवर  किंवा  फेसबुकवर गुंगून गेलेली.  आता हे वाचून झाली का पंचाईत ?  या स्क्रीनवरची नजर काढून आजूबाजूला बघणे आले ना !!!? गुड माॅर्निंग मित्रा "                                                                                                                                      हल्ली माझे  असे फेस बुक वर होत असे पण कागदी पुस्तक वाचून जे समाधान लाभते ह्या चेहरा पुस्तकात नाहीच!                                                                                       हसावे की रडावे? कशातही फार गुंतून जाणे वाईट

पाऊस

 पाउस पडून जुना झाला पण आज संधी मिळाली पावसात भिजायची आणि जाणवले कि हा जुना कधी होतच नाही. भिजले की  मनाला आनंदाचे नवे कोपल फुटतात. तप्त मनावर शीतल शिडकावा होतो.पुन्हा नव्याने उन्ह सोसायची तयारी होते आणि त्यातूनही नवे काही घडवावेसे वाटते.

वेदना

 मैतरणीचे स्वप्न गोजिरे मनापासून  जोजवले ,  कसे  कुठे  अन् काय  बिनसले  ,गेले  गेले  निसटले. अस्वस्थ  मनाचे मुकेच रूदन कुणास कैसे   ऐकवले. अरण्यरूदन केवळ  ठरेल हे मनोमनी तरी  जाणवले.  विनाशब्द हे आसू ओघळती हृदय अंतरी दुखावले.  क्षमा  प्रीतीचा बोध आठवून मनास पुन्हा  कवळीले नव्या  दमाने उत्साहाने नवनवे गाणे  हे गुंफत गेले. दुःखास दडवून हृदयांतरी मी मुखवटे सुखाचे पेहेरले. संध्या  पाटील

मराठी अक्षरे ङ आणि ञ

 DrVinayak Kapure यांनी त्यांच्या भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.) #ङ_ञ_व_त्र मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना का वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की? मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  : क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग) च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग) ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो,

ड्राइविंग

 काल पहिल्यांदा  मुंबई ते नाशिक गाडी चालवली. Feeling happy. खूप मस्त  वाटले. घाटात ट्राफिक जाम  होता. नेमका  काल एक ट्रक  पलटी झाला  होता.  पण लवकरच पोलिसांनी  मार्ग  मोकळा  केला.  नंतर  आम्ही  आणि  आमची इनोव्हा ! तीन तासात  मुंबई  ते नाशिक. ..... Love you INNOVA..